सोमवार, १५ ऑगस्ट, २०१६

असावगड

नाव      : असावगड (Asavgad)

उंची      : २४०० फूट

दर्जा      : मध्यम
        
ठिकाण : वारंगडे( बोईसर )

वेळ      :  १.४५ ते  २ तास

 

कसे पोहोचायचे :


पश्चिम रेल्वे मार्गे
:

                पश्चिम रेल्वेवरून डहाणू लोकल पकडून बोईसर स्टेशनवर उतरावे. तसेच विरार स्टेशन वरून विरार-डहाणू लोकल ट्रेन आहेत. मुंबई सेंट्रल वरून सुटणाऱ्या काही पॅसेंजर गाड्या सुद्धा बोईसर स्टेशनवर थांबतात.


मध्य रेल्वे मार्गे
:

              मध्य रेल्वेवरील डोंबिवली स्टेशन वरून सकाळी ५ वा. ४३ मि. सुटणाऱ्या डोंबिवली-डहाणू लोकलने बोईसरला जाता येते.
                  

बोईसर स्टेशन वर उतरल्यावर पश्चिमेला बाहेर पडावे. असावगड (Asavgad) किल्याच्या जवळ असलेल्या वारंगडे गावात जाण्यासाठी टम-टम(Six Sitter) उपलब्ध असतात, तसेच जवळच असलेल्या एसटी डेपो मधून ठाणे किंवा कल्याणला जाणाऱ्या एसटी बसेस वारंगडे गावात थांबतात.

 

 वारंगडे बस थांब्यावर उतरून थोडे पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूस जाणारा छोटा डांबरी रस्ता किल्याच्या दिशेने जातो. डांबरी रस्त्याने १० ते १५ मि. चालत गेल्यावर डाव्या बाजूला अंगणवाडी लागते, अंगणवाडीच्या समोरूनच (रस्त्याच्या उजव्या बाजूस ) एक कच्चा रास्ता किल्ल्याकडे जातो. कच्या रस्त्याने ओहळ ओलांडून ५-६ मि. चालत गेल्यावर आडवा रास्ता लागतो. आडव्या रस्त्याला लागुनच एक नाला आहे, या नाल्यावर ३ पूल आहेत. पहिल्या आणि  तिसऱ्या पुलावरून किल्यावर जाता येते. पहिला पुल थोडा मोठा आणि दुसरा व तिसरा पुल पहिल्या पुलाच्या तुलनेत छोटे आहेत. 
 

पहिला पुल ओलांडून पुढे चालत गेल्यास जंगलातून जाणारा रस्ता लागतो. या रस्त्याने गडावर जाता  येते. हा रस्ता जंगलातून जात असल्याने वाट शोधत पुढे जावे लागते, त्यामुळे वाटाड्या असेल तरच या रस्त्याने जावे.

 

तिसरा पुल (पहिल्या पुल न ओलंडता उजवीकडे चालत जाऊन तिसरा पुल लागतो ) ओलांडून पुढे चालत गेल्यास समोरच्या छोट्या टेकडीवर जाणारी पायवाट लागते. त्या वाटेने चालत गेल्यावर डोंगराला वळसा घालून गडावर जाता येते.  

 

सूचना:
  • बोईसर ते वारंगडे गावापर्यंत जाण्यासाठी टम-टम आणि बस अंदाजे रु. १० / व्यक्ती घेतात.
  • काळानुसार गाड्यांचे भाडे / वेळापत्रक बदलते, त्यामुळे ट्रेकची योजना करताना स्वत: संशोधन करावे. 
  • डावर जाणारे रस्ते दाट झाडीतून असल्यामुळे किडे / डास चावतात. त्यामुळे किडे / डास चावू नये यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.   
  • वाटाड्या घेऊनच पहिल्या पुलाच्या रस्त्याने जावे, नाहीतर रस्ता चुकण्याची जास्त शकत्या आहे.

अनुभव आणि  छायाचित्र :


बोईसर रेल्वे स्टेशन
          सकाळी बोईसर स्टेशनवर उतरल्यावर वारगंडे गावाकडे जाण्यासाठी बोईसर - कल्याण बस पकडली.

बोईसर - कल्याण बस
वारागंडे

                       वारागंडे गावात उतरल्यावर गडावर (Asavgad) जाण्यासाठी आम्ही आमचा प्रवास सुरू केला. 

गडाकडे जाणारा डांबरी रस्ता


ओहळ ओलांडून लागणारा कच्चा रास्ता

















                        गडावर (Asavgad) जाण्यासाठी आम्ही पहिल्या पुलावरून जाणारा रस्ता निवडला.

पहिल्या पुलावरून जाणारा रस्ता
जंगलातून जाणारा रस्ता
ढगांतुन  पडणारा जोरदार पाऊस आणि दाट जंगल, त्यामुळे गडाकडे जाणारा रस्ता सापडत नव्हता. शेवटी आम्ही परत माघे फिरून तिसऱ्या पुलावरून जायचे ठरवले. 

तिसरा पूल

















डोंगराला वळसा घालून गडावर जाणारी पायवाट













                                              १.३० ते २ ता. चालत-चालत, फोटो काढत गडावर पोहचलो.






                     गडावर (Asavgad) असलेल्या पाण्याच्या साठ्याजवळ बसून जेवायला सुरवात केली. 


 बोईसर स्टेशन वरून जास्त अंतराने गाड्या असल्यामुळे , गडावर थोडी भटकंती करून ३ वा. परतीच्या प्रवासाला सुरवात केली.






























सोमवार, २५ जुलै, २०१६

भिवगड

नाव      : भिवगड (Bhivgad / Bhimgad)

उंची      : ८०० - ८५० फूट

दर्जा      : सोपा

ठिकाण : वदप ( कर्जत )
 
वेळ      :  ३० -४५


 

कसे पोहोचायचे :

                             कर्जत स्टेशन वर उतरल्यावर पूर्वेला किंवा पश्चिमेला बाहेर पडावे. दोन्ही बाजूने वदप गावाकडे जाण्यासाठी टम-टम (Six Sitter) / रिक्षा (Rickshaw) उपलब्ध असतात. 
वदप गावातून थोडं पुढे गेल्यावर धबधब्याकडे जाणारा रस्ता लागतो आणि धबधब्याचा रस्ता सोडल्यावर पुढे उजव्या बाजुला एक कच्चा रस्ता भिवगडकडे (Bhivgad) जातो. 

सूचना:
  • कर्जत ते वदप गावापर्यंत जाण्यासाठी टम-टम / रिक्षा अंदाजे रु. १५० घेतात.
  • पावसाळ्यामध्ये भिवगडावर(Bhivgad) गेल्यास गडाजवळ असलेला धबधबा ही पाहता येतो. 

अनुभव आणि  छायाचित्र :

 

सकाळी ७ वा. च्या सुमारास कर्जत स्टेशन वर उतरून चहा नाष्टा केल्यावर वदप गावाकडे जाण्यासाठी टम-टम (Six Sitter) भाड्याने करून प्रवासास सुरवात  केला.

                                   
भाड्याने केलेली टम-टम
चहा






















                                       १५ ते २० मि. प्रवास करून भिवगडाच्या पायथ्याशी पोचलो.

                           

                                        गड छोटा असल्यामुळे १ ता. पावसात भिजत गडावर पोचलो. 

भिवगड ढाकबहिरी कडे जाणारा मार्ग

                    एक दीड तास गडावर फिरून झाल्यावर धब धब्याच्या दिशेनं जाण्यासाठी निघालो. 





गडावरून काढलेला फोटो

१५ ते २० मि. धबधब्या जवळ पोहोचलो 
धबधब्या



दोन अडीच तास धबधाब्याखाली चिंब भिजुन झाल्यावर परतीच्या प्रवासाला निघालो. 



मंगळवार, २८ जून, २०१६

रायगड

नाव : रायगड किल्ला (Raigad Fort)

उंची      : 2700-2900 फूट  

दर्जा      : मध्यम

ठिकाण : पाचड ( रायगड / Raigad )

वेळ      :  २ तास

 

 

कसे पोहोचायचे :

                         मुंबई / पुणे ते  महाड जाण्यासाठी एस.टी (ST) बस आहेत. तसेच महाड ते रायगड (Raigad) किल्याच्या पायथ्याशी (पाचड गावापर्यंत) जाण्यासाठी एस.टी (ST) किंवा एस.टी (ST)  डेपो बाहेरून खाजगी वाहने मिळू शकतात. 


सूचना: 

  • डावर जाण्यासाठी रोपवेची(Ropeway) व्यवस्था असल्यामुळे १५ ते २० मि. गडावर पोहचता येते.
  • जास्त जणांचा ग्रुप असेल तर मुंबई/पुणे>महाड>पाचड हा प्रवास खाजगी गाडीने करणे योग्य ठरेल.  
  • डावर जाण्यासाठी अंदाजे १५०० पेक्षा जास्त पायऱ्या चढाव्या लागतात.  
  • रायगड (Raigad) किल्ल्यावर राहण्याची व खाण्याची  सोय आहे.     

अनुभव आणि  छायाचित्र :


शिवराज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त बघून आम्ही रायगडावर (Raigad ) जाण्याचे ठरवले आणि ठरल्याप्रमाणे रात्री प्रवासाला सुरवात केली.


रात्रभर प्रवास करून पहाटे रायगडाच्या पायथ्याची पोचलो. राज्याभिषेक असल्यामुळे गाडी थोडी लांब उभी करावी लागली.













 















           पाऊस आणि धुक्याच्या आनंद घेत पहाटेच्या ताज्या हवेत गड चढायला सुरवात केली.



                                             राज्याभिषेकासाठी गडावर मोठी गर्दी उसळली होती.
गडावर चढत असलेले शिवभक्त
                                      
                                         दोन-अडीच तासात घोषणा देत गडावर पोचलो
रायगड किल्याचा नकाशा

                            गडावर वेगवेगळे ढोल ताशा पथके आपली कलाकृती सादर करण्यासाठी आले होते. 

मल्हार ढोल ताशा पथक
शिवदर्शन ढोल ताशा पथक 
शिवमावळा ढोल ताशा पथक

                                              राज्याभिषेकासाठी असलेली गडावरची गर्दी बघून ,
                        असे वाटत होते जणू गडावर भगव्या आणि पांढऱ्या रंगाची चादर पसरलेली आहे.


पालखी



       ढोल ताश्यांच्या गजरात गडावर शिवाजी महाराज्यांचा जयजयकार करत सगळे बेधुंद होऊन नाचत होते. 



                             रात्री गाडीत गाण्यांच्या भेंड्या खेळून , गड चढून आणि नाचुन दमल्यामुळे 
                                               शेवटी आम्हाला पोटाची आठवण झाली.  

                                     पेटपूजा झाल्यावर आम्ही गडावर भटकंती करायला सुरवात केली 











गडावर काढलेली रांगोळी
गडावर काढलेली रांगोळी
दुपार नंतर ढोल ताश्या पथकांची आवराआवर चालू झाली. दुपारी ४ वा. गडावर भटकंती झाल्यावर आम्ही सुद्धा गड उतरायला लागलो.